Monday 9 December 2013

‘आम’ ते ‘आप’

व्यक्ती जोपर्यंत ‘आम’ असते तोपर्यंत ती तुमच्यासाठी नेहमी तत्पर असते पण तीच जेव्हा ‘आप’ होते तेव्हा त्याच्या वागण्याचा रोख बदलतो आणि लोकशाही क्षणात हुकुमशाही मध्ये बदलून जाते. खरं तर या गोष्टीला असे होण्यासाठी काळ किती लागतो याही पेक्षा ती कशी बदलत जाते याचा प्रवास खरंच विलक्षणच असतो. अश्या बदलांना पूरक असणे हा खरा तर मानवी गुणधर्मच आहे जोपर्यंत तुम्ही कार्यकर्ता असता तोपर्यंत 'सामान्य' आणि एखाद्या ग्रुपचा लीडर किंवा नेता बनता तर लगेच 'असामान्य'. गोष्टी एका निकालावरून लगेचच बदलत जातात्त. सोडून गेलेल्यांना आपल्या पुण्यायीच्या जोरावर मिळाले असे वाटते आणि परतीचे दोर स्वतःच तोडून टाकलेले असल्याने आंतरिक हाव असूनही वळता येत नाही. आणि मग सोबत गेलो असतो तर तिथली गरम हवा आपल्याला पण चाखायला मिळाली असते असं मनोमन वाटायला लागते.      

जेव्हा तुम्ही स्वतःचा एखादा व्यवसाय सुरु करता तेव्हा माणसं जोडताना जिभेवर नेहमी मध ठेवून असता. जेव्हा भरभराट होते, थोडक्यात जेव्हा तुम्ही ‘प्रस्थापित’ होता आणि सुरुवातीच्या शिलेदारांची किंमत असून नसल्यासारखी जेव्हा वाटू लागते तेव्हा त्यांना क्षणात ‘विस्थापित’ करण्यास तुम्ही अजिबात धजावत नाही. याला कॉर्पोरेट भाषेमध्ये ‘डोंट टेक इट पेर्सोनली’ असं बोलून बोळवण केली जाते. तसेच दुसऱ्या अर्थाने कॉर्पोरेट मानले जाणारे क्षेत्र म्हणजे ‘राजकारण’ यामध्ये देखील गणितं एका क्षणात बदलून जातात ‘जिकडे हवा तिकडे पूर्व दिशा’ अशी प्रवृत्ती अनेकदा आढळून येते ‘राजकारणामध्ये कोणी कोणाला अस्पृश्य नसतो’ असे म्हणून मांडीला मांडी लावून मग पुढची नांदी सुरु होते.

हे सुद्धा अगदीच खरं आहे, कोणी कोणाला अस्पृश नसतोच. आणि मग यातूनच 'तुला थोडे' आणि 'मला थोडे' अशी अपप्रवृत्ती वाढायला लागते आणि न वाढवणारयांच्या वाट्याला येतो तो एकतर वनवास किवां स्वर्गवास.


-सुरेश सायकर                     

Tuesday 19 November 2013

!!! निर्व्याज जगण्याचा प्रवास !!!

अनेकदा माणसं वेड्यासारखी धावतच राहतात, यंत्रवत. कशाचेच भान राहत नाही इतकेच काय तर यंत्र बनवता बनवता स्वतःला कधी यंत्रामध्ये बदलून टाकले याचे देखील भान राहत नाही. रात्री झोपण्याआधी उद्याचीच चिंता मग येणारी झोप देखील पाठ दाखवून मस्तपैकी थंड हवेत, चांदण्यांच्या उजेडात निवांत फिरायला बाहेर पडते. चालू वर्तमानकाळ काय असतो अनेकदा विसरूनच जातात, आस आणि ओढ असतेती फक्त भविष्यकाळाची, जीच्या पोटात दडलेले असते ऐषोआरामात जगण्याचे स्वप्न. आजचेच भान नसल्यावर भविष्यतरी कसे काय उज्वल असणार याचे सोप्पे गणित देखील कोणी सोडवायला तयार नसतात. कारण जवळचे पहायचे सोडून लांबचं दिसणारा चष्मा डोळ्यावर चढवलेला असतो.      
       
मग अशातच कधीतरी जोरात धावत असताना धडपडतात, ठेच लागते आणि मग भानावर येतात. क्षणभर काहीच समजत नसल्यामुळे कोमात गेल्यासारखे वाटतात. कारण सर्व काहीच थांबून जाते रोजचे धावणे, वेळेत पोहचण्याचा अट्टाहास,भुकेचे भान नसणे, भुकेल्या पोटी गोड गरम पाण्याचे  विष पोटात एकसारखे ढकलत राहणे, हे काहीच उरत नाही. उरतो तो फक्त न जाणारा वेळ. मनगटात असून देखील कधी वेळ पाहण्याचे भान नसलेल्यांना एकसारखे मनगटावरचे, भिंतीवरचे, मोबाईलवरचे,लेप्टोपवरचे घड्याळ दर सेकंदालाआहे तिथेच असल्यासारखे दिसते. मग यातून निर्माण होते ती फक्त चिडचिड. जी स्वतःला आणखीनच आतमधून पोखरत जाते. अश्यावेळी आपण कोण? काय आपले इप्सित? आत्तापर्यंत शेवटचे मनापासून कधी हसलोय आणि कधी मनापासून एखादा क्षण जगलोय? हे स्वतःला विचारण्याचे भान देखील राहत नाही. अशातच एखाद्याला त्याची जाणीव होते, थोडासा स्वतःला आपणच आहोत याची खात्री देण्यासाठी आरश्यामध्ये न्ह्याळतो, स्वतः असल्याची खात्री पटते कारण नेहमी आरश्यासमोर पावडर लावलेला चेहरा असतो आणि आजचा जाणीव झाल्यानंतरचा. खरं तर चेहऱ्यामध्ये काहीच फरक झालेला नसतो,फरक झालेला असतो तो पाहण्याच्या दृष्टीकोनात.

आणि सुरु होतो खरा जगण्याचाप्रवास, ज्याच्यासाठी आपला जन्म झालेला असतो, ज्यासाठी मानवी शरीर आपल्याला बहाल झालेलं असत ते खरं माणूसपणाचे आणि माणुसकीचे जगणं. खोटे जगण्याचे, आणि जगणाऱ्यांचे चेहरे आणि मुखवटे लगेच समजून यायला लागतात. कारण मुळातच एकूण पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल झालेला असतो. मग रस्त्यावर एखाद्या नडलेल्या मदत होते, एखाद्या जुन्या फक्त चेहेरा ओळखीचाअसलेल्या माणसाला रस्त्यावरून जाताना मुद्दामून भेटले जाते आणि आस्थेने चौकशी केली जाते भलेही तो आपल्यापेक्षा कमी शिकलेला किवां कमी दर्जाची नोकरी करणारा असला तरीही, अशातच फक्त लांबचे दिसणाऱ्या चष्माची फ्रेम कधी गळून पडते आणि जवळची आपली माणसं कधी दिसू लागतात हे देखील समजत नाही. आणि मग त्यानंतर उरतो तो फक्त निर्व्याज जगण्याचा प्रवास.  

- सुरेश सायकर

Friday 25 October 2013

खंत ...


काही तरी कारणाने मूड खराब झाला होता. डोक्यातून काही केल्या तो विषयच जात नव्हता. मार्केटयार्ड मधून जाताना थोडी कसरतच असते ट्रक रस्त्यावरच उभे केलेले असतात आणि अशातच साधारण १२ ते १४ वर्ष वयोगटातील दोन मुले रस्ता ओलांडत होते. मी माझ्या विचारात आणि ते त्यांच्या आनंदात आणि इतक्यात दोघांपैकी एकजण  पुढे जाता जाता एकदम  थांबला हे अचानक घडल्यामुळे मी विचारातून भानावर येईपर्यंत आणि त्याला वाचवायला गाडी बाजूला घेईपर्यंत तो मुलगा गाडीवर आदळला स्वतःला लागू  म्हणून डिफेंस मोड मध्ये त्याने त्याचा हात गाडीच्या हेडलाईट वरील पेनेलला लावला. मागचा पुढचा विचार न करता मी  खाड्कन त्याच्या थोबाडीत लगावली. ते एकदम कोमजलच....ते एवढंसं बारकं माझ्या फटक्याने कळवळलं...निरागसपणे माझ्या डोळ्यात बघत होतं...बहुतेक त्याला सांगायचं असावं की तू गाडी चालवताना विचाराच्या  तंद्रीमध्ये चाललेला होतास आणि निट लक्ष नाही असं वाटून मी अचानक थांबलो होतो. त्याच्या कानाखाली लावल्यावर देखील मी त्याला बडबड करतच होतो. तरीही तो शांतपणे गालावर हात घट्ट धरून रस्ता ओलांडत होता. त्याचा मित्र त्याच्या हाताला धरून त्याला घेवून जात होता. मला वाटल शेजारच्या झोपडपट्टी मधली मुलं असतील आणि छोटी असल्यामुळे मारू न शकणारी मला कमीतकमी  शिव्या घालून तरी जातील पण असं काहीच घडलं नाही. बहुतेक  बाजूला असणाऱ्या एखाद्या हॉटेल मधली कामगार असावीत ....

राग शांत झाल्यावर मलाच नंतर अपराध्यासारख वाटायला लागलं आणि ठरवलं कि त्याला भेटून त्याची माफी मागायची. काहीही कारणाने त्याला हसवायचं जेणेकरून तो कालचा प्रकार विसरून जाईल. रोज येताना त्या ठराविक भागामध्ये त्याला शोधायचा प्रयत्न केला, तिथल्या हॉटेलमध्ये पण विचारून पाहिलं पण तो मुलगा परत कधीच दिसला नाही. मनमोकळ्यापणाने माफी मागायची होती ती खंत मनामध्ये तशीच राहिली.    

बरीच वर्षं  उलटून गेलीत या घटनेला त्याचा चेहरा सुद्धा नीट आठवत नाही आठवतात ते फक्त त्याचे डोळे...पाण्याने भरलेले. त्यादिवशी तो ज्या निरागसपणे माझ्याकडे बघत चाललेला होता त्याच्या डोळ्याला डोळा भिडवणे पण मला शक्य होत नव्हतं. रात्रभर बहुतेक झोपलंच नसावं, कळवळला असेल खूपच, त्याच्या आईला सांगितल्यावर तिने माझ्या नावाने कडाकडा बोटं मोडली असतील. रात्रभर सुजलेल्या गालावरून अश्रू ओघळले असतील, ती रात्र  तळमळत जागूनच काढली असेल त्याने  आणि  त्या दिवसापासून मात्र माझी झोप उडालेलीच आहे... कायमची                   

Friday 18 October 2013

!!! बहते हुए सूखे जख्म !!!!

हर शाम की तरह वो भी इक रंगीन शाम थी,
हर चेहरे पर मुस्कान फ़ैली थी,
खिलखिलाते, मासूमियतसे भरे जिन्दगीका लुत्फ़ उठा रहे थे,
हर कोई एकदूसरेको हँसा रहा था,
उस रेस्तोरां का माहौल हर रोजक़े शाम जैसा ही था.....

लेकिन,आज की शाम, हर शाम जैसी नहीं थी उन दोनों के लिए,
कुछ ख़ास था वो लम्हा जिसका गवाह था ये रेस्तोरां,
हमेशा की तरह वो दोनो बैठे थे आंखोंमें आंखें डालकर,
हाथोंमें हाथ थामकर सजा रहे थे सपना नयी दुनिया का,
जिसे पूरा करनेके के लिए रोका था ख़ुदको कुछ अरसोंसे,
अब उनका रिश्ता तबदील होने जा रहा था इक पवित्र बंधन में....

रेस्तोरांका मालिक गवाह था उनकें और ऐसे कई जोडोंका,
जिन्होंने जिन्दगीके दुसरे पड़ाव की नीव वही थी डाली,
मुस्कुराते हुए उसने दोनोंको देखा....और तभी.....

धाय धाय की आवाजसे पूरा माहोल बदल गया,
गोलियोंके बौछार से तहेलका मच गया,
हर कोई ख़ुद को और अपनोको बचाने भागने लगा,
कुछ भी सूझ नहीं रहा था,
मुस्कुराता माहौल एकदम मौत के सन्नाटे में बदल गया...
क्योंकि इन्सान, इन्सान का ही दुश्मन बन बैठा था,

हर तरफ़ लाल रंग की कालीन बिछी हुई थी,
और उसपर लगे थे इन्सानोंके अम्बार,
कोई अपनोको ढूंड रहा था, तो कोई इन्सानियत को ...


उन दोनों में से वो बची थी,
हाथोंको थमाये हुए उसके बेजान खुली आँखोंमें बस देखें जा रही था,
कुछ लम्हों पहेलेकी रंगीनिया अन्धकार में बदल चुकी थी....

रेस्तोरांके दीवार से गोलियोंके निशान तो मिट गए थे,
पर दिलोंमें आज भी ताज़ा है....

….इक अरसा बीत गया पर न भूली सकी वो उस हादसेको,
खून तो क़ब का बहना बंद हो चूका था,
लेकीन सूखे हुए जख्म अभी भी बह रहे है....नम आँखोंसे....

- सुरेश सायकर

Thursday 3 October 2013

चित्रपट : ऱ्हास आणि श्वास

जुन्या काळातील चित्रपटांमध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रित ठेवून चित्रपटांची निर्मिती केली जायची. ज्यामध्ये नायक  अगदी गरीब घरातील, ज्याला रोजच्या जगण्यासाठी कष्ट पडावे अशी 
परिस्थिती परंतु त्यातून काही अदभुत आणि  नाट्यमय वळणं घेत त्याच्या आयुष्यात चांगले दिवस यायचे. चारचाकी गाड्यांमधून फिरणाऱ्या श्रीमंत घरातील मुली सोबत त्याचे प्रेमप्रकरण व्हायचे त्यातून समाजाशी आणि तिच्या श्रीमंत बापाशी लढून शेवटी गरीब घरातील नायकाचा विजय व्हायचा. जशी आजही गरिबी आहे तशीच ती तेव्हाही होती. पण चित्रपटांच्या एका फुंकरने सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आयुष्यात नेहमीच तजेला यायचा, आपल्यादेखील आयुष्यात सोनेरी सकाळ उगवेल याच आशेमध्ये प्रत्येकजण जगायचा. येणाऱ्या संकटाना धीरपणे चित्रपटातील नायकासारखे तोंड देण्याची ताकद खरी तर चित्रपटांमुळेच यायची. यातून अनेकांच्या जीवनात खरंच रंग भरले, चुकीच्या मार्गाने गेल्यास परिणीती काय होते याची जाणीव देखील चित्रपटांमधून दिसत असल्याने कोणीही तो मार्ग पत्करायला धजावयाचे नाही. आपल्यादेखील आयुष्यात कोणीतरी येईल आणि तीच्यावर आपण देखील नायकाप्रमाणे भरभरून प्रेम करू अशी चित्र रंगवली जायची. यामध्ये कोणत्याही  किळसवाणा वाटावा असा प्रकार जात दाखवला नव्हता. शारिरीक सुखाऐवजी फक्त प्रेम या संकल्पनेवरच संपूर्ण जीवन न्योझावर केलं जायचं.

काळ बदलला, तसे चित्रपटांचे स्वरूप देखील बदलून गेले. आता सर्वसामान्य प्रेक्षकांना समोर ठेवून कोणत्याच चित्रपटांची निर्मिती केली जात नाही.जिथे फक्त एका गाण्यासाठी विदेशी लोकेशनवर चित्रीकरण केले जात आहे तिथे सर्वसामान्याच काय तर एखादा उच्च मध्यमवर्गीय सुद्धा येत नाही. सध्या चित्रपटांची निर्मिती फक्त आणि फक्त पैसा याच एका संकल्पनेवर आधारित होती. पूर्वीसुद्धा ती होती, मान्यच आहे, मात्र  मुल्यांची आणि संस्काराची कास  न सोडता. आताशा काहीसे विकृतीकडे झुकणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. नितीमूल्यांचा ऱ्हास सर्रास होताना दिसत असून त्याकडे कानाडोळा आपण करूच शकत नाही. कारण तुम्ही कितीही नाही म्हंटला तरीही त्याचा थेट संबंध जरी तुमच्या सोबत  नाही आला तरी तो तुमच्या घरच्या एखाद्या सदस्याशी तरी नक्कीच येतो. मग अश्यावेळेस माझं  नाही ना काही वाकडं होत  अशी पुळचट भूमिका घेणे शक्य तरी आहे का?

 मल्हार...